Akshaya trutiya अक्षय तृतीयेचे महत्व




अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस पवित्र मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा पवित्र मानला जातो. सोने खरेदी करण्यासाठी व नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेपासून वसंत ऋतूची सुरुवात होते.

अक्षय तृतीया

अक्षय राहो आरोग्य आपले, 

अक्षय राहो सुख आपले, 

अक्षय राहो नाते आपले,

अक्षय राहो प्रेम आपले.


                       अक्षय तृतीयेचे महत्त्व

  • महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना हद्दपार करण्यासाठी अक्षय तृतीयेला अक्षय पत्र दिले.
  • अक्षय तृतीयेला अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला.
  • भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीय दिवशी झाला. 
  • अक्षय तृतीयेला गंगा नदी देवाच्या भूमीत आली.
  • अक्षय तृतीयेला कुबेराने लक्ष्मी देवीचे पूजन केले.

अक्षय म्हणजे कधीही कमी होणार नाही असे. त्यामुळे दानधर्म, यज्ञ जप केल्याने व्यक्तीस काहीही कमी पडत नाही उलट त्याच्यामध्ये भरच पडते व पुण्य कर्म घडते. अक्षय तृतीया सुख, समाधान व शांतता तसेच सौभाग्य आणते असे मानले जाते. अक्षय तृतीयेला सोने खरेदीचे खूप महत्त्व आहे. बरेचजण या दिवशी सोने खरेदी करण्यास महत्त्व देतात. अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्यास भविष्यामध्ये समृद्धी व संपत्ती वाढते. या दिवशी सोने खरेदी केल्यास त्याचे मूल्य वाढते असे मानले जाते. हिंदू धर्मातील ग्रंथानुसार अक्षयतृतीयेची सुरुवात त्रेता युगात झाली आहे. भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराची जयंती, परशुराम जयंती व अक्षय तृतीया एकाच दिवशी असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या