Shrikrushna Janmashtami श्रीकृष्ण जन्माष्टमी, कथा - श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी - उत्सव साजरा करण्याची पद्धत, श्रीकृष्णा जयंती - दहीकाला / गोपाल काला,श्रीकृष्णांबद्दल सर्व माहिती,कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते ती पुढील प्रमाणे..., जन्म ठिकाण,जन्मदाते माता पिता,संगोपन करणारे पालक,बहीण भाऊ, गुरु शिक्षक,जिवलग मित्र,धर्मपत्नी ८,कृष्णाची मुले,आवडती फुले ,आवडता प्राणी,शंख, आयुधं,बासरी,मोरपंख,शिक्षण,कार्य,गीता उपदेश,श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण,अवतार समाप्ती

      श्रीकृष्ण जन्माष्टमी



श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला बुधवारी रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर झाला होता. कंसाची बहिण देवकी व वासुदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा होता. हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी साजरा केला जातो. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात व  आनंदात हा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असेही म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. दही किंवा दहीकाला हाहा श्रीकृष्णाचा आवडता खाद्यपदार्थ आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सव हा भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. दुपारी बारा वाजता श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्म उत्सव मोठया आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो.


श्रीकृष्णांबद्दल सर्व माहिती

१) श्रीकृष्णाचा जन्म : ५२५२ वर्षांपूर्वी झाला 

२) जन्मतारीख : १८ जुलै, ३२२८ ई.स. पूर्व 

३) महिना: श्रावण 

४) दिवस: अष्टमी 

५) नक्षत्र: रोहिणी 

६) दिवस: बुधवार 

७) वेळ: १२:०० रात्री

८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य. 

९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व

१०) जेव्हा कृष्ण ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.

११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, इसा पुर्व ३१३९ रोजी सुरु झाले होते.

१२) २१ डिसेंबर इसा पुर्व ३१३९ रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.)

१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती.



कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते ती पुढील प्रमाणे...


  • मथुरेत कृष्ण, कन्हय्या 
  • ओडिशामध्ये जगन्नाथ
  • महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा
  • राजस्थानमध्ये श्रीनाथ
  • गुजरातमध्ये द्वारकाधीश, रणचोछोड 
  • कर्नाटकातील उडुपी
  •  कृष्णाकेरळमधील गुरुवायुरप्पन 


जन्म ठिकाण

मथुरा


जन्मदाते माता पिता

 देवकी, वासुदेव


संगोपन करणारे पालक

 यशोदा, नंद


बहीण भाऊ

सुभद्रा, बलराम,(द्रौपदी मानलेली बहीण.)


गुरु शिक्षक

ऋषी संदिपनी


जिवलग मित्र 

सुदामा


धर्मपत्नी ८

रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मना (शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.)


कृष्णाची मुले

 एकूण ८०


  • श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) 

प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.


  • श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) 

 भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु.


  • श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) 

 सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु.


  • श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) 

वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती.


  • श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) 

श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.


  • श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०)

 प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित.


  • श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) 

वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि.


  • श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०)

 संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.


राधा

राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे,' असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तु आहेत.


आवडती फुले 

फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे)


आवडता प्राणी

प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्री कृष्ण हे उत्तम (रथाचा) सारथी होते.


शंख

 शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.


आयुधं

 त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.


बासरी

कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती .


मोरपंख

रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे.


शिक्षण

श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.


कार्य

कुरुक्षेत्र च्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. (म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यकी होता ज्याला भुतकाळ आणि भविष्यकाळ माहित होते तरी सुध्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले.श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे.


गीता उपदेश

महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.


श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण

कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार-निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो-कर्तव्याच्या पालनासाठी. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."

              "मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते." गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही." सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते! कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.


अवतार समाप्ती

महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीच वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इ. स. पू. ५५२५ या वर्षी झाला.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानीर्भवति भारत।

अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम्।।

परित्राणाय साधुनाम विनाशायच दुष्कृताम्।।।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे।।।।


कथा - श्रीकृष्ण जन्माष्टमी

कंस व देवकी ही शूरसेनाची मुले होती. देवकीचे वासुदेवाबरोबर लग्न झाले होते. देवकीच्या मुलांच्या हातूनच तुझा मृत्यु होईल, असे भविष्य कंसाला सांगितलेले होते. म्हणूनच भीतीने कंसाने देवकी आणि वासुदेव यांना तुरुंगात बंदिस्त केले होते. देवकी म्हणजेच कंसाची सख्खी बहिण हिचे प्रत्येक मुल जन्मल्याबरोबरच तो मारून टाकत असत. देवकीचे आठवे बाळ जन्माला येणार होते एक दिव्य तेज आपल्या उदरात शिरत आहे, असा दृष्टांत देवकीला झाला होता. आठव्या मुलाला मारण्यासाठी कंसाने तयारी केली होतीच. परंतु आठव्या महिन्यात देवकी प्रसूत झाली. रात्री बारा वाजता मुसळधार पाऊस पडत होता. पहारेकरी झोपेत होते. वासुदेव आणि देवकी यांनी हे मुल वाचवायचे ठरवले. वासुदेव यमुना नदी ओलांडून मथुरेला गेला. तेथे नंद हा त्याचा मित्र होता. त्याच्या घरी यशोदेला मुलगी झाली होती. वासुदेवाने आपला मुलगा तेथे ठेवला आणि नंदाची मुलगी घेऊन तो परत आला होता. कंसाने या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तेजाचे रूप घेऊन आकाशात गेली होती. कपटी कंसापासून स्वतःचे रक्षण तिने केले होते. कंसाला “तुझे मरण जवळ आले आहे” असे या शक्तीने सांगितले होते. इकडे श्रीकृष्ण नंदाच्या घरी वाढत होता. वासुदेवाच्या रोहिणी या दुस-या राणीचा मुलगा म्हणजे बलराम होय. श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपणा होता.  यातून समाजाशी एकरूप होण्याचे तसेच मिळून मिसळून राहण्याचे त्याचे आचरण दिसून येते.

                  कृष्णाला गोपाल असे सुद्धा म्हटले जाते. कृष्णाचे गोपाल हे नाव याच अर्थाचे आहे. ‘गो’ म्हणजे गाय. गाईचे पालन करणारा तो गोपाल, असा त्यचा अर्थ आहे.  तसेच माधव, गोपाल, मुकुंद, मुरारी, मधुसादन, श्रीहरी व श्रीकृष्ण इत्यादी अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे गीता सांगणारा श्रीकृष्ण होय. ज्या संस्कृतीत मर्यादापुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा पुरुषोत्तम, युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण प्रभू श्रीरामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून शिकायला आपणास मिळते. श्रीकृष्णाच्या जन्माची कथा तसेच त्याचे संपूर्ण जीवन अदभूत आहे. रामायणाच्या काळात यमुना नदीच्या दक्षिण किना-यावर मधुबन नावाचा सुपीक प्रदेश होता. हा प्रदेश म्हणजेच मथुरा होय. या ठिकाणी रामाचा बंधू शत्रुघ्न याचे राज्य होते. त्यानंतर यादव घराण्याचे राज्य होते. वासुदेव या यादव घराण्यापैकी एक होय. गोपालन, दुध विक्री हा या यादवांचा मुख्य व्यवसाय होता.


श्रीकृष्ण जन्माष्टमी - उत्सव साजरा करण्याची पद्धत 

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करतात. मध्यरात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म उत्सव साजरा करतात. त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.


श्रीकृष्णा जयंती - दहीकाला / गोपाल काला 

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी व तूप हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे "काला" होय. श्रीकृष्णाने  गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांनी मिळून भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करतात. तसेच श्रीकृष्णाला दही, दूध व लोणी असे दुधाचे पदार्थ खूप आवडतात. पूर्वी ते उंच शिंक्याळ्यात ठेवले जात असत. ते पदार्थ श्रीकृष्ण आपल्या सवंगड्याच्या साथीने एकमेकांच्या खांद्यावर चढून काढत असत. ते दहीहंडी तयार करून ती फोडत असायचे. त्याचे स्मरण म्हणून आज आपण दहीहंडी मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करत असतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या