Dip Amavasya दीप अमावस्येचं महत्त्व, दीप अमावस्या शुभ मुहूर्त, दीप अमावस्या पूजन कसे करावे?

Dip Amavasya दीप अमावस्येचं महत्त्व, दीप अमावस्या शुभ मुहूर्त, दीप अमावस्या पूजन कसे करावे? 



गटार ( Gutter) नव्हे , गताहार!


आषाढी अमावस्येनंतर आहारामध्ये बदल केला पाहिजे. आषाढी अमवस्या किंवा दीप अमावस्या दिवसाला गताहारी (जो आहार गेला आहे तो) अमावस्या म्हणतात. आपल्या प्रत्येक सणांची नावे संस्कृतवर आधारित आहेत. Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळपणे जोडलेला आहे. आपली लायकी गटारात लोळायची आहे, असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय. आपल्या महान संस्कृतीची लाभलेली आहे.आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे. आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. आपले सण आपणच संस्कृतीने साजरे करत असतो.
गटार (Gutter) नव्हे, गताहार
गत = मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते
आहार = भोजन
गत+आहार = गताहार
जसे:-
शाक+आहारी = शाकाहारी
तसे:-
गत+आहारी = गताहारी
गत+आहारी+अमावस्या = गताहारी अमावस्या

या दिवशी दीप पुजन करतात



हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.

आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया

१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.

२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली  तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.  त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. 

३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.

४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते  हवेतील वाढलेल्या  जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. 

५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक  घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो. 

अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे  आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.

 

या दिवसात शाकाहार करण्यामागे शास्त्रीय कारणेही आहेतच

१) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही  मिळत नाहीत. 

२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या  जातात. 

३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.                                              

४) विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या  जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक आपोआप शरीराला लाभतात. 

५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.  

म्हणून विनंती करतो  
"श्रावण जरूर पाळा, परंतु गटारीची कुप्रसिद्धी टाळा"!

आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या दिवशी दीप पूजन केले जाते व सुंदर अशी रांगोळी काढली जाते. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झालं असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं. यावर्षी आषाढ अमावस्या आज ४ ऑगस्ट रोजी आहे. यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असं म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो. 


दीप अमावस्येचं महत्त्व

आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या  स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त  पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात ४ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. ही अमावस्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी ०३वाजून ५०मिनिटांनी सुरु होईल तर ४ऑगस्टला दुपारी ४ वाजून ४२ मिनिटांनी दीप अमावस्या संपन्न होईल. अशी' साजरी करा दीप अमावस्या  दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. तो तिळाच्या तेलाने किंवा तूपाने प्रज्वलित करा. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. 'या' मंत्राचा जप करा  पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की,  हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो.


दीप अमावस्या शुभ मुहूर्त 

पंचांगानुसार दीप अमावस्या ४ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. ही अमावस्या ३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेली आहे व ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजून ४२ मिनिटांनी संपणार आहे. तेथून पुढे श्रावण महिना सुरू होणार आहे.


दीप अमावस्या पूजन कसे करावे? 

  • या दिवशी लवकर उठून देवाचे स्मरण करावे.
  • पवित्र नदीमध्ये आंघोळ करावी. आंघोळ करण्यासाठी तुमच्याजवळ नदी नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पवित्र नदीतून आणलेले तीर्थ टाकावे व आंघोळ करावी.
  • आंघोळ केल्यानंतर सूर्य देवतेला जल अर्पण करावे. 
  • या दिवशी भगवान विष्णू व भगवान शंकर यांची मनोभावे पूजा करावी. 
  • घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात.
  •  यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवावा. 
  • तो तिळाच्या तेलाने किंवा तूपाने प्रज्वलित करावा. 
  • या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा करावी.
  •  पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करावा.
  • या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी गोरगरिबांना दानधर्म करावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या